सिंधुदुर्ग , २ मार्च , ( वार्ता ) – होळी म्हणजे दुष्ट प्रवृत्ती आणि अमंगल विचार यांचा नाश करून सत्प्रवृृत्तीचा मार्ग दाखवणारा उत्सव. वृक्षरूपी समिधा अग्नीत अर्पण करून त्या माध्यमातून वातावरणाची शुद्धी करणे, हा उदात्त भाव होळी साजरी करण्यामागे आहे. दुर्दैवाने सध्या या उत्सवाला विकृत स्वरूप प्राप्त झाले आहे. धर्मशास्त्र समजून घेऊन त्यानुसार सण-उत्सव साजरे केले, तर त्याचा आध्यात्मिक लाभ होतो.
कोकणात होळी हा सण प्रत्येक गावात , शहरात साजरा केला जातो. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही गावामध्ये अपवाद वगळता सर्व ठिकाणी होळी मोठ्या उत्साहात साजरा झाला. हिंदूंचे धार्मिक सण – उत्सव आदर्श रीत्या कसे साजरे करावेत या बाबत हिंदूंना प्रभोधन व्हावे यासाठी सनातन संस्था आणि हिंदुजनजागृती समिती यांनी संयुक्त रित्या जिल्ह्यात दोन ठिकाणी आदर्श होळीउत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा केला.

सावंतवाडी , कुडाळ, या ठिकाणी मोट्या संख्येने सनातन संस्थेचे साधक हिंदुजनजागृतीचे कार्यकर्ते असेच धर्माभिमानी हिंदु उपस्तिथ होते . सावंतवाडी- येथे श्री देव नारायण मंदिर समोरील भागात होळीचे पूजन काण्यात आले , यावेळी कोलगाव येथील धर्मप्रेमी रवी भिसे यांनी पूजन केले तर पुरोहित म्हणून श्रीपाद काशाळीकर यांनी विधिवत पूजा केली . या वेळी एकूण यावेळी सनातनचे संत सद्गुरु सत्यवान कदम यांची वंदनीय उपस्थिती लाभली.यावेळी१०० हुन अधिक सनातनचे साधक, हिंदुजनजागृती समितीचे कार्यकर्ते, धर्माभिमानी हिंदु उपस्थित होते .
