Uncategorized

भाडेकरूने ५० वर्षे किंवा त्याहून अधिक काळ वास्तव्य केले तरी मालकी हक्क घरमालकाचाच राहणार आहे..! सुप्रीम कोर्ट

Spread the love

दिल्ली: भाडेकरू ३ वर्षापेक्षा जास्त काल एखाद्या घरात भाड्याने राहिला त्या घरावर हक्क दाखवतो. अशी अनेक प्रकरण समोर आली आहेत. तसेच याबाबत काही दावे देखील दाखल आहेत. पण याबाबत आता सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे की, एखादा भाडेकरूने ५० वर्षे किंवा त्याहून अधिक काळ वास्तव्य केले तरी मालकी हक्क घरमालकाचाच राहणार आहे.“आम्ही इथे पिढ्यानपिढ्या राहतो” हा दावा आता चालणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. कारण भाडेकरू हा केवळ परवानगीवर राहतो—तो मालक बनत नाही. विरुद्ध ताब्याचा कायदा भाडेकरूंना लागू होत नाही. असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे. सुप्रीम कोर्टचा हा निर्णय घरमालकांसाठी मोठा दिलासादायक ठरला आहे.


Spread the love

Related posts

विरार पूर्व येथे मसाले उद्योग प्रशिक्षण केंद्र सुरू….

news

कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा- सावंतवाडी व स्टेपिंग स्टोन स्कूल ग्लोबल स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने ”मराठी भाषा गौरव दिना”चे आयोजन.

प्रसाद परब

सागर कन्स्ट्रक्शन! बांधकाम क्षेत्रांतील विश्वसनीय नाव

news

Leave a Comment