स्टोरी

कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यांत जाणवले भूकंपाचे सौम्य धक्के !

Spread the love

कोल्हापूर: कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यांत १६ ऑगस्टच्या सकाळी नागरिकांना भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपामुळे तिन्ही जिल्ह्यांत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सातारा जिल्ह्यातील पाटण जवळच्या गावांत ग्रामस्थांना भूकंपाचा धक्का जाणवला. सकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी हा भूकंपाचा धक्का जाणवल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. ‘नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी’ यांच्या माहितीनुसार भूकंपाचा केंद्रबिंदू हा भूमीपासून ५ किलोमीटर खाली होता. कोल्हापूरात ३.४ रिक्टर स्केल (भूकंप मोजण्याचे परिमाण) भूकंपाचा धक्का नागरिकांना जाणवला. हा भूकंपाचा धक्का सकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी जाणवला. या भूकंपाचाही केंद्रबिंदू भूमीपासून ५ किलोमीटर खाली असल्याची माहिती देण्यात आली आहे, तर सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील चांदोली अभयारण्य परिसरातही भूकंपाचा धक्का जाणवला. चांदोली अभयारण्यापासून १५ किलोमीटर परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.


Spread the love

Related posts

प्रभू श्री राम नामाच्या जयघोषाने मालवण नगरी दुमदुमली…!

news

श्रीराम पंचायतन मंदिर पानवळ, डेगवे, बांदा येथे श्रीरामनवमी उत्सव.

news

बिळवस येथे विजेचा शॉक लागून तीन बैल मृत्युमुखी..! एक लाख ६४ हजार रुपयांचे नुकसान

news

Leave a Comment