स्टोरी

कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यांत जाणवले भूकंपाचे सौम्य धक्के !

Spread the love

कोल्हापूर: कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यांत १६ ऑगस्टच्या सकाळी नागरिकांना भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपामुळे तिन्ही जिल्ह्यांत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सातारा जिल्ह्यातील पाटण जवळच्या गावांत ग्रामस्थांना भूकंपाचा धक्का जाणवला. सकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी हा भूकंपाचा धक्का जाणवल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. ‘नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी’ यांच्या माहितीनुसार भूकंपाचा केंद्रबिंदू हा भूमीपासून ५ किलोमीटर खाली होता. कोल्हापूरात ३.४ रिक्टर स्केल (भूकंप मोजण्याचे परिमाण) भूकंपाचा धक्का नागरिकांना जाणवला. हा भूकंपाचा धक्का सकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी जाणवला. या भूकंपाचाही केंद्रबिंदू भूमीपासून ५ किलोमीटर खाली असल्याची माहिती देण्यात आली आहे, तर सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील चांदोली अभयारण्य परिसरातही भूकंपाचा धक्का जाणवला. चांदोली अभयारण्यापासून १५ किलोमीटर परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.


Spread the love

Related posts

हडपीड स्वामी समर्थ मठ येथील साडेतीन शक्तीपीठ दर्शन सोहळ्यास प्रारंभस्वामी प्रकटदिन सोहळा उत्साहात संपन्न!

news

कोकण रेल्वे मार्गावर अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या सोडण्यात येणार.

news

शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या रमेश यादव याच्या विरोधात भुमाफिया रमेश रामदुलार यादव विरोधी शेतकरी मंच आक्रमक.

news

Leave a Comment