स्टोरी

फाळणीच्‍या वेळी बळी गेलेल्‍या भारतवासियांचे श्रद्धापूर्वक स्‍मरण करा ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

Spread the love

विभाजन विभीषिका स्‍मृतीदिन’ देशभरात साजरा !

१५ ऑगस्ट वार्ता: स्‍वातंत्र्याच्‍या अमृतमहोत्‍सवाच्‍या कार्यक्रमांच्‍या अंतर्गत १४ ऑगस्‍ट या दिवशी सरकारच्‍या वतीने ‘विभाजन विभीषिका स्‍मृतीदिन’ साजरा केला गेला. १४ ऑगस्‍ट १९४७ या दिवशी भारताची फाळणी झाली. विस्‍थापनाच्‍या वेदना झेलणार्‍या लोकांच्‍या स्‍मरणासाठी हा दिवस साजरा करण्‍यात आला. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्‍स’वरून पोस्‍ट (ट्‍वीट) केले की, हा दिवस त्‍या भारतवासियांचे श्रद्धापूर्वक स्‍मरण करण्‍यासाठी आहे, ज्‍यांचे जीवन देशाच्‍या फाळणीच्‍या वेळी बळी गेले. हा दिवस त्‍या लोकांचे कष्‍ट आणि संघर्ष यांचेही स्‍मरण करवतो, ज्‍यांना विस्‍थापनाचा दंश झेलण्‍यास बाध्‍य व्‍हावे लागले होते. अशा सर्व लोकांना माझे शत शत नमन !

राजधानीत या निमित्ताने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. कार्यक्रमाला विस्‍थापित कुटुंबांना निमंत्रित करण्‍यात आले होते. फाळणीच्‍या वेळी प्राण गेलेल्‍या लोकांना श्रद्धांजली अर्पण करण्‍यात आली. असेे कार्यक्रम देशभरात आयोजित करण्‍यात आले. या वेळी फाळणीशी संबंधित चलचित्रे, तसेच ऐतिहासिक कागदपत्रांचे प्रदर्शन भरवण्‍यात आले होते. यामध्‍ये फाळणीशी संबंधित पुस्‍तकांचे प्रदर्शनही लावण्‍यात आले होते.


Spread the love

Related posts

सचिव वरूण सरदेसाई यांनी आमदार वैभव नाईक यांच्या निवासस्थानी दिली भेट.

news

लेखक बाळकृष्ण राणे यांच्या ‘जास्वंदी’ कथा संग्रह पुस्तकाचे सायन्सच्या १९८२ च्या बॅचकडून प्रकाशन.

news

अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ, सावंतवाडीतर्फे भव्य शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्ग संपन्न..!

news

Leave a Comment