स्टोरी

जय जय राम कृष्ण हरी! सार्थ हरिपाठ!

Spread the love

साधुबोध झाला नुरोनिया ठेला । ठायीच मुराला अनुभवे कापुराची वाती उजळली ज्योति । ठायीच समाप्ति झाली जैसी ।। मोक्षरेखें आला भाग्ये विनटला । साधूचा अंकिला हरिभक्त ।। ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी। हरि दिसे जनी आत्मतत्त्वी ।।

अभंगाचा भावार्थ: साधूंच्या संतांच्या उपदेशाचा बोध ज्याला अनुभवाने झाला तो न उरून उरतो – मुरतो म्हणजे स्वतःच्या अधिष्ठानात ‘मरुन’ उरतो. ज्याप्रमाणे कापूर अग्नीच्या स्पर्शाने अग्नीरूप होतो व नंतर तो अग्नीही नाहीसा होऊन त्याठिकाणी केवळ आकाश शिल्लक राहते, त्याप्रमाणे आत्मानुभवाचा प्रसाद झाल्यावर साधकाच्या जीवभावाचे ब्रह्मभावात रुपांतर होते. शेवटी तो ब्रह्मभाव सुद्धा विलयाला जाऊन केवळ नाम तेवढे शिल्लक राहते. जो साधूच्या अंकित आहे, त्याच्या उपदेशाप्रमाणे वागणारा आहे अशा हरिभक्तालाच मोक्ष मिळण्याचे भाग्य मिळते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्याला संतसंगतीची गोडी लागली त्यालाच हरि सर्वत्र भरलेला आहे असा अनुभव प्राप्त होतो.

जय जय राम कृष्ण हरी


Spread the love

Related posts

माझं गाव, आरोग्य संपन्न गाव; समितीवर शासनातर्फे सदस्य तथा एनजीओ म्हणून रवी जाधव व पत्रकार विनायक गावस यांची सदस्य पदी निवड

प्रसाद परब

खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंगने केलं मोगा पोलिसांसमोर त्याने आत्मसमर्पण

news

जोसोली फणसखोल येथील प्रधान मंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत झालेल्या रस्त्याची दुरावस्था!

news

Leave a Comment