स्टोरी

आचरा ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेला साथ देणाऱ्या मतदारांचे आभार- हरी खोबरेकर

Spread the love

सिंधुदुर्ग: आचरा ग्रामपंचायत निवडणूक शिवसेना पक्षाने पहिल्यांदाच स्वबळावर लढविली आहे. या निवडणुकीत यश मिळाले नसले तरी थोड्या फरकाने शिवसेनेचे उमेदवार पराभूत झाले आहेत. भाजपने भरमसाठ पैसा वापरून, आणि खोटी आश्वासने देऊन सत्ता मिळविली असली तरी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली आचरा गावच्या विकासासाठी शिवसेना यापुढेही सर्वोतोपरी सहकार्य करणार आहे.भाजपच्या उमेदवारांनी आचरा गावातील काही प्रश्नांवरून मतदारांना भावनिक करण्याचा देखील प्रयत्न केला. मागील निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार ९०० पेक्षा जास्त मतांनी पराभूत झाले होते. मात्र यावेळी भाजपचे मताधिक्य घटले असून २४२ मतांनी त्यांचा विजय झाला आहे. येणाऱ्या काळात आचरा वासियांचा विश्वास संपादन करण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून यापेक्षाही चांगले काम करू आणि आचरा वासियांच्या आणि कार्यकर्त्यांच्या कायम पाठीशी राहू असे शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी सांगितले आहे.


Spread the love

Related posts

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी १६-१८ फेब्रुवारी रोजी कोकणपुत्र, श्री. सत्यवान रेडकर सरांचे निशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन…!

news

हिंदु संत आणि संप्रदाय यांची बदनामी करणार्‍या ’महाराज’ चित्रपटावर तत्काळ बंदी घाला !

news

सावंतवाडी वेंगुर्ला बस स्टँड वरील प्रसाधनगृहाची दुरावस्था..! प्रवासी व नागरिकांमध्ये नाराजी.

news

Leave a Comment