स्टोरी

कोल्हापूर, सातारा, पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी!

Spread the love

२३ जुलै वार्ता: राज्यात पुढील पाच दिवस पावसाच्या दृष्टीने चिंतेचे असणार आहेत. कारण संपूर्ण राज्यभरात मुसळधार ते मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्यातील काही भागात पुरस्थिती निर्माण झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आठवड्याभरापासून सुरू असलेल्या पावसाचा जोर अद्यापही कमी होण्याचे नाव घेत नाही. हवामान विभागाकडून राज्यातील महत्त्वाच्या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला असून काही जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या आठवड्याभरापासून राज्यात मुसळधार पाऊस जोरदार बरसत आहे. अशातच हवामान विभागाने कोल्हापूर, सातारा, पुणे, पालघर, ठाणे, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. या भागांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.


Spread the love

Related posts

आर.पी.डी. कॉलेजचे शिक्षक दिगंबर राणे यांचं निधन.

news

महाराष्ट्राचा रानकवी ना. धो. महानोर यांच्या निधनाने मला अतिशय दुःख झाले आहे ! शरद पवार

news

कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकार सतर्क!

news

Leave a Comment