स्टोरी

उच्च न्यायालयाचा पुढील आदेश येईपर्यंत छत्रपती संभाजीनगर नव्हे, औरंगाबादच म्हणा! जिल्हाधिकार्‍यांचा आदेश…

Spread the love

१७ मे वार्ता: उच्च न्यायालयाचे पुढील आदेश येईपर्यंत महसूल आणि इतर विभागांशी संबंधित कोणत्याही कार्यालयाने ‘औरंगाबाद’ हेच नाव लिहावे, असा आदेश छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी काढला आहे. न्यायालयाच्या या आदेशाचे काटेकोर पालन करा, असे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सर्व कार्यालय आणि विभागप्रमुख यांना दिले आहेत.शहराचे नाव पालटून ‘छत्रपती संभाजीनगर’ असे नामांतर करण्यासाठी केंद्रशासनाने संमती दिल्यानंतर अनेक ठिकाणी पालटलेल्या नावाचा उल्लेख चालू झाला आहे, तर काही शासकीय कार्यालयांनीही कार्यालयांच्या नामफलकात नवीन नावाने पालट केला आहे. नामांतराविषयी प्राप्त झालेल्या आक्षेपांची सुनावणी चालू असतांना महसूल आणि इतर विभागांशी संबंधित कार्यालये जिल्ह्याचे नाव पालटत असल्याची गोष्ट याचिकाकर्ते आणि त्यांचे विधीज्ञ यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली आहे. त्यावर उच्च न्यायालयाने वरील आदेश दिले आहेत.


Spread the love

Related posts

उद्योजक महेंद्र पालव यांच्या वतीने पोईप येथे शैक्षणिक साहित्य वाटप.

news

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व वकिलांना एकत्र घेऊन आपण काम करणार! अँड. परिमल नाईक

news

हडपीड स्वामी समर्थ मठ येथे २३ मार्च रोजी साडेतीन शक्तीपीठ दर्शन सोहळा! प.पु. जगतगुरु शंकराचार्य करवीर पीठ, कोल्हापूर यांची प्रमुख उपस्थिती.

news

Leave a Comment