स्टोरी

कलंबिस्त ग्रामसेवा मंडळ मुंबई नवीन कार्यकारणी जाहीर.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: कलंबिस्त ग्रामसेवा मंडळ मुंबई हे मंडळ मुंबई स्थित ग्रामस्थांच्या हितासाठी अडचणी सोडवण्यासाठी स्थापन झाले आहे. हे मंडळ मुंबईत गावाच्या विकासाच्या दृष्टीने सातत्याने प्रयत्न करत आहे. मंडळाची बैठक मुंबईत घेण्यात आली. यावेळी नवीन कार्यकारणी निवडण्यात आली. अध्यक्षपदी विश्वनाथ सावंत यांची फेरनिवड करण्यात आली. तर,सचिवपदी माजी सैनिक, रविंद्र सावंत खजिनदार प्रकाश तावडे यांची एकमताने निवड करण्यात आली. या बैठकीला माजी सचिव शशिकांत सावंत सुरेश सावंत चंद्रकांत बिड ये प्रकाश मायबा सावंत जयसिंग देसाई काशीराम म्हाडगुत, रमेश देसाई, दीपक पास्ते, लक्ष्मण मर्गज, शांताराम बिडये, अमित मेस्त्री, रवींद्र सावंत, बापू पांगम, ज्ञानेश तावडे, राजेश सावंत, दशरथ बिडये, अनंत सावंत, महादेव सावंत, सुरेश पास्ते, प्रकाश तावडे, मिलिंद मटकर, अमित बिडये आधी उपस्थित होते.

यावेळी सचिव शशिकांत सावंत यांनी पदाचा राजीनामा दिला. त्याबद्दल चर्चा करण्यात आली व तो मंजूर करून नवीन कार्यकरणी निवडण्याबाबत चर्चा झाली. यावेळी नवीन कार्यकरणी निवडताना तरुणांना जास्तीत जास्त मंडळाच्या सभासद करणे व मंडळ अधिक गतीने वाढवणे या दृष्टीने विचार करण्यात आला. अध्यक्षपदी विश्वनाथ सावंत यांचे फेरनिवड जाहीर करण्यात आली. त्यानंतर सचिव पदी रवींद्र सावंत यांच्या नावाला एक मत झाले. खजिनदार प्रकाश तावडे तसेच अधिक कार्यकरणी निवडण्यात आली.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष विश्वनाथ सावंत यांनी स्पष्ट केले कि, कलंबिस्त गाव विकासाच्या दृष्टीने आपण यापूर्वी काम केले आहे. यापुढेही काम करायचे आहे. मुंबई गावातील अनेक जण नोकरीच्या निमित्ताने कार्यरत आहेत. त्यांच्या समस्या अडचणी सोडवण्याच्या दृष्टीने हे मंडळ नेहमी सहकार्य करत आहे. तसेच गावचा एकीचा नारा या निमित्ताने आपण देऊया असे ते म्हणाले. यावेळी सुरेश सावंत यांनी गेल्या कित्येक वर्षापासून हे मंडळ कार्यरत आहे. या मंडळाच्या हिताच्या दृष्टीने आपण पुन्हा एकदा एकत्र येऊया असे आवाहन त्यांनी केले. ज्यावेळी चंद्रकांत बिड ये यांनी मुंबईमध्ये आपल्या गावातील हजार हून अधिक नोकरीनिमित्त वास्तव्यास आहेत त्यांची एकी व एकीचा नारा आपण यानिमित्ताने देऊया मुंबई व गावाच्या विकासाच्या दृष्टीने आपण हातभार लावूया, गेली काही वर्ष मंडळचे उपक्रम झाले नाही. आता आपण जोमाने पुन्हा कामाला लागू या तरुणाने जास्तीत जास्त सभासद व्हावे.असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी शशिकांत सावंत, नवनिर्वाचित सचिव रवींद्र सावंत, खजिनदार प्रकाश तावडे, आदींनी आपले विचार मांडले.


Spread the love

Related posts

कोलकाता उच्च न्यायालयाचा शिवलिंगाला हटवण्याचा आदेश लिहितांना न्यायालयाचे अधिकारी बेशुद्ध पडले !

news

त्र्यंबकेश्वर येथील श्रीगुरुपीठात ‘याज्ञिकी’ प्रशिक्षणाचे आयोजन!

news

आंबोली येथील ग्रामस्थांनी माजी नगरध्यक्ष बबन साळगावकर मानले यांचे आभार.

news

Leave a Comment