कणकवली | महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : कणकवली तालुका वैश्य समाजाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांच्या सन्मानार्थ एक प्रेरणादायी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यंदा चौथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षा, जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, दहावी, बारावी तसेच डॉक्टर, इंजिनियर, वकील, सी.ए. आणि पीएच.डी. सारख्या उच्च शिक्षणात उत्कृष्ट यश मिळवणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचा विशेष गौरव करण्यात येणार आहे.हा उत्साही सोहळा रविवार, १२ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता भालचंद्र महाराज संस्थान, कणकवली येथे संपन्न होणार आहे. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह व भेटवस्तू देऊन त्यांच्या यशाचा गौरव करण्यात येईल.समाजबांधवांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान करून इतरांना प्रेरणा मिळावी हा मुख्य उद्देश आहे.”
नोंदणी : दहावीत किमान ८०%, बारावीत किमान ७०% किंवा उच्च शिक्षणात यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांनी आपले गुणपत्रक सत्यप्रत व मोबाईल क्रमांकासह ५ जुलै २०२६ पूर्वी श्री. निवृत्ती धडाम यांच्या दुकानात सादर करावेत.पालक, समाजबांधव व हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या गौरव सोहळ्याला शोभा वाढवावी, असे आयोजकांनी आवाहन केले आहे.
