स्टोरी

सावंतवाडी आगरातील स्वच्छता गृहाची दुरावस्था….!

Spread the love

सावंतवाडी: महाराष्ट्र परिवहन महामंडळ सावंतवाडी आगरातील स्वच्छता गृहाची इतकी दुरावस्था झाली आहे कि याचा वाफर केला तर संसर्ग जन्य जंतूमुळे इतर कोणतातरी आजार होऊ शकतो अशी भीती प्रवाशांना सतावत असून प्रवासी स्वच्छता वाफर करण्यास घाबरत आहेत.  महाराष्ट्र परिवहन मंडळ सावंतवाडी आगार हे उत्पन्नाच्या दृष्टीने महत्त्वाचे आगार आहे. या आगारातून सीमेलगतच्या गोवा कर्नाटक राज्यात अनेक बसेस ए जा करत असतात महाराष्ट्र राज्यातील अनेक बस गाड्या सुटत असल्याने प्रवाशांची वर्दळ फार मोठ्या प्रमाणात असते राज्यात पहिली रातराणी बस सेवा मुंबईसाठी गाडी सोडण्याचा पहिला मान या आगाराला मिळाला होता. आज मात्र या आगाराची दुरावस्था झाली असून आगर परिसरात प्लास्टिक बाटल्या कचरा यांचे ढीग दिसतात.

जमिनीवरील लाद्या उकडलेले आहेत. पुरुष स्वच्छतागृहाची केविलवाणी अशी दुरावस्था झाली आहे. मुतारीचा पन्हाळ मूत्राचा निचारा न झाल्याने तुडुंब भरलेल्या त्याचा वास 100 मीटर पर्यंत येतो स्वच्छतागृहात जाऊन नैसर्गिक विधी करणे कठीण बनले या मूत्राच्या संसर्गजन्य जंतूमुळे विधी केल्यास आपल्यास अन्य आजार उद्भवू शकतो अशी भीती प्रवाशांत आहे. नैसर्गिक विधी केल्यानंतर हात धुण्यासाठी असलेल्या बेसिनमध्ये तुटलेले असून नळ  आहेत. याविषयी आगर प्रमुख निलेश गावित आणि स्थानक प्रमुख विशाल शेवाळे यांची भेट घेऊन याविषयी निदर्शनास आणले असता प्रवासी बाटल्या टाकतात, नळ तोडून टाकतात असे सांगितले.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री शेखर चन्ने यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले महामंडळाचे खाजगीकरण होणार नाही. असा आशावाद केला. प्रत्यक्षात प्रवासी येण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागणार आहे. राज्यभरातील काही बस स्थानकांना संचालकाने अचानक भेट देऊन वास्तुस्थिती जाणून घ्यावी अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.


Spread the love

Related posts

मसुरे पशुवैद्यकीय अधिकारी त्वरित न मिळाल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा माजी सभापती छोटू ठाकूर यांचा इशारा.

news

कुडाळ मधील दोन मनोरूग्ण बांधव आश्रय आणि सुरक्षिततेसाठी संविता आश्रमात दाखल…!

news

बालासोर रेल्वे अपघातप्रकरणी सीबीआयने ३ जणांना केली अटक!

news

Leave a Comment