राजकारण

बाळासाहेब थोरात यांची राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी हास्यास्पद: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Spread the love

१६ जुलै मुंबई वार्ता: महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ सुरू असताना आणि विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या मागणीवर नवी मुंबईत समर्थकांमध्ये पोहोचलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब थोरात यांची मागणी हास्यास्पद असल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रतिक्रिया देताना म्हणाले, 210 आमदारांसह पूर्ण बहुमताचे आमचे सरकार आहे, अशा स्थितीत ही मागणी बड्या नेत्याने करणे हास्यास्पद आहे.

काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, पक्ष विधानसभेत मुख्य विरोधी पक्षाचा दावा करेल. थोरात म्हणाले की, ‘आमच्याकडे ४५ आमदार आहेत, त्यामुळे काँग्रेसचा उमेदवार नियुक्त करणे योग्य ठरेल. काँग्रेस नेतृत्व एक-दोन दिवसांत नाव निश्चित करणार आहे..अजित पवार यांनी विरोधी पक्षनेतेपद सोडले तेव्हापासून हे पद कोणाला मिळावे यावर वाद सुरू झाला आहे. अधिकृत नोंदीनुसार, काँग्रेसकडे 45 आमदार आहेत, तर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने 16 आमदारांच्या समर्थनाचा दावा केला आहे, तर शिवसेनेकडे (यूबीटी) 15 आमदार आहेत. अलीकडच्या राजकीय घडामोडींपूर्वी शिवसेनेकडे ५५ तर राष्ट्रवादीचे ५३ आमदार होते.दरम्यान विधानसभा विरोधी पक्षनेतेपदासाठी थोरात आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यात चढाओढ असल्याचे समजते. शिवाय रविवारी महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. या बैठकीला शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे नेते उपस्थित राहणार आहेत.


Spread the love

Related posts

निर्णय घ्यायला विधानसभा अध्यक्षांना वेळ नाही! खासदार संजय राऊत.

news

महाराष्ट्राचे अराजध्य दैवत असलेल्या विठ्ठलाची उपमा एखाद्या राजकीय नेत्याला देणं शोभतं का? तुषार भोसले

news

शिवसेनेच्या महाराष्ट्र घडविण्याच्या वारीत सामील व्हा..! किरण सोनावणे.

news

Leave a Comment