जाहिरात

फडणवीसांच्या पहाटेच्या शपथविधिच्या गौप्यस्फोटानंतर गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल!

Spread the love

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच पहाटेच्या शपथविधीबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करूनच आपण अजित पवारांबरोबर शपथविधी घेतला होता, असा गौप्यस्फोट फडणवीसांनी केला. फडणवीसांच्या या गौप्यस्फोटानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण pllआलं आहे.देवेंद्र फडणवीसांच्या गौप्यस्फोटानंतर भारतीय जनता पार्टीचे नेते गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला आहे. शरद पवारांचं राजकारण गद्दारीशिवाय आणि पाठीत खंजीर खुपसल्याशिवाय पूर्ण होत नाही, अशी टीका पडळकर यांनी केली. ते धुळे येथे कोळी समाजाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी पवारांवर हल्लाबोल केला.देवेंद्र फडणवीसांनी पहाटेच्या शपथविधीबाबत केलेल्या गौप्यस्फोटावर प्रतिक्रिया देताना म्हणाले, “शरद पवारांचा चेहरा आधीच गद्दारीने काळवंडला होता. आता देवेंद्र फडणवीसांनी एकच वाक्य सांगितलं आणि पवारांचा चेहरा डांबरासारखा काळा झाला आहे. ते फडणवीसांच्या गौप्यस्फोटावर निरुत्तरित आहेत. ते या विषयात काहीच बोलू शकत नाहीत. त्यांच्या प्रदेशाध्यक्षांनी मागच्या १५ दिवसांत सांगितलं होतं की, हे शरद पवारांच्या सांगण्यावरून झालं. म्हणजेच हे पुन्हा एकदा सिद्ध झालं की, शरद पवारांचं राजकारण गद्दारीशिवाय आणि पाठीत खंजीर खुपसल्याशिवाय पूर्ण होत नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.”


Spread the love

Related posts

Street “BACHELOR’S COFFEE” HOT & COLD sawantwadi

news

समर्थ नारळ आणि नारळ तेल एजन्सी.

news

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

news

Leave a Comment