स्टोरी

वाफोली गावात काजू बागेला आग लागून मोठ्या शेताकऱ्यांची प्रमाणात नुकसान

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: ७ मे रोजी दुपारी वाफोली गावातील बबन आना गवस आणि बाबली आना गवस यांच्या तिलारी कॅनल लगत असलेल्या काजू बागेमध्ये आग लागली. यामध्ये अंदाजे चार एकर जमिनीवरील काजूची झाडे आणि बांबूची बेटे जळून खाक झाली. यामध्ये जवळपास १०० मोठी काजूची झाडे आणि १०० बांबूची बेटे पूर्णपणे जळून खाक झाली. यामध्ये अंदाजे चार लाखाचे नुकसान झाले असून सदरची आग कोणी लावली याबाबत नक्की कल्पना आली नाही ही आग कॅनल वरून चालू होऊन खाली बागेत गेली.

जळून खाक झालेलू बांबूची बेटे
जळून खाक झालेली काजुची झाडे

सदरच्या जागेवर कालव्याच्या दुरुस्तीचे काम चालू असून मागील सहा महिन्यापासून ठेकेदारांनी तेथे तात्पुरत्या स्वरूपात शेड उभारल्या आहेत आणि आपले सामान ठेवले आहे आणि त्यांची माणसे तेथे कायमस्वरूपी वस्तीला आहेत. पण ठेकेदाराच्या कुठल्याही सामानाचं नुकसान झालं नाही.


Spread the love

Related posts

मिलाग्रीस प्रशालेमध्ये राज्य क्रीडा दिन व मकरसंक्रांती उत्साहात साजरा…!

news

गेळे येथील मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद! 

news

वडाचापाट शाळा येथे शैक्षणिक साहित्य वाटप!

news

Leave a Comment