स्टोरी

वाफोली गावात काजू बागेला आग लागून मोठ्या शेताकऱ्यांची प्रमाणात नुकसान

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: ७ मे रोजी दुपारी वाफोली गावातील बबन आना गवस आणि बाबली आना गवस यांच्या तिलारी कॅनल लगत असलेल्या काजू बागेमध्ये आग लागली. यामध्ये अंदाजे चार एकर जमिनीवरील काजूची झाडे आणि बांबूची बेटे जळून खाक झाली. यामध्ये जवळपास १०० मोठी काजूची झाडे आणि १०० बांबूची बेटे पूर्णपणे जळून खाक झाली. यामध्ये अंदाजे चार लाखाचे नुकसान झाले असून सदरची आग कोणी लावली याबाबत नक्की कल्पना आली नाही ही आग कॅनल वरून चालू होऊन खाली बागेत गेली.

जळून खाक झालेलू बांबूची बेटे
जळून खाक झालेली काजुची झाडे

सदरच्या जागेवर कालव्याच्या दुरुस्तीचे काम चालू असून मागील सहा महिन्यापासून ठेकेदारांनी तेथे तात्पुरत्या स्वरूपात शेड उभारल्या आहेत आणि आपले सामान ठेवले आहे आणि त्यांची माणसे तेथे कायमस्वरूपी वस्तीला आहेत. पण ठेकेदाराच्या कुठल्याही सामानाचं नुकसान झालं नाही.


Spread the love

Related posts

दत्ताराम सातू सावंत यांच्या ‘विज्ञान रंजन मनोरंजन’ या स्व -लिखित विज्ञान पुस्तिकेचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते प्रकाशन 

news

अवैध वाळूउपसा केल्‍यास थेट ‘मकोका’ लागणार! – महसूलमंत्री विखे पाटील

news

हडपीड येथे स्वामी समर्थ प्रकटदिन सोहळा अपूर्व उत्साहात संपन्न!

news

Leave a Comment