स्टोरी

वाफोली गावात काजू बागेला आग लागून मोठ्या शेताकऱ्यांची प्रमाणात नुकसान

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: ७ मे रोजी दुपारी वाफोली गावातील बबन आना गवस आणि बाबली आना गवस यांच्या तिलारी कॅनल लगत असलेल्या काजू बागेमध्ये आग लागली. यामध्ये अंदाजे चार एकर जमिनीवरील काजूची झाडे आणि बांबूची बेटे जळून खाक झाली. यामध्ये जवळपास १०० मोठी काजूची झाडे आणि १०० बांबूची बेटे पूर्णपणे जळून खाक झाली. यामध्ये अंदाजे चार लाखाचे नुकसान झाले असून सदरची आग कोणी लावली याबाबत नक्की कल्पना आली नाही ही आग कॅनल वरून चालू होऊन खाली बागेत गेली.

जळून खाक झालेलू बांबूची बेटे
जळून खाक झालेली काजुची झाडे

सदरच्या जागेवर कालव्याच्या दुरुस्तीचे काम चालू असून मागील सहा महिन्यापासून ठेकेदारांनी तेथे तात्पुरत्या स्वरूपात शेड उभारल्या आहेत आणि आपले सामान ठेवले आहे आणि त्यांची माणसे तेथे कायमस्वरूपी वस्तीला आहेत. पण ठेकेदाराच्या कुठल्याही सामानाचं नुकसान झालं नाही.


Spread the love

Related posts

मनसे अध्यक्ष मा. श्री राज साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आंबोली हिरण्यकेशी देवस्थान येथे होणार महाअभिषेक…! केतन सावंत.

news

शंकर दत्ताराम आडेलकर यांनी भाजी विक्रेती वृद्ध महिला साई शेळके हिची रस्त्यात पडलेली १४ हजार रुपयाची रक्कम केली परत.

news

छत्रपती संभाजीनगर येथे स्‍वतःचे मृत्‍यू प्रमाणपत्र घेऊन महिला पोचली पंचायत समितीत!

news

Leave a Comment