स्टोरी

आतंकवादी आक्रमणात अतीमहत्त्वाच्‍या वास्‍तू सुरक्षित ठेवण्‍याविषयीचा तज्ञांचा अहवाल राज्‍यशासनाला सादर

Spread the love

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: आतंकवादी आक्रमण, तसेच अन्‍य मानवनिर्मित आपत्ती यांपासून रुग्‍णालये, पंचतारांकित हॉटेल्‍स, शाळा, देवस्‍थाने आदी अतीमहत्त्वाच्‍या वास्‍तू सुरक्षित कशा ठेवव्‍यात? याविषयी उपाययोजना सुचवणारा अहवाल तज्ञ समितीने राज्‍यशासनाकडे सादर केला आहे. तज्ञांच्‍या समितीने ३ मे या दिवशी मंत्रालयात मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन हा अहवाल त्‍यांच्‍याकडे सुपुर्द केला. तज्ञांच्‍या समितीचे अध्‍यक्ष प्रवीण परदेशी, सदस्‍य अपर मुख्‍य सचिव सुजाता सौनिक, मुंबई महापालिकेचे मुख्‍य अभियंता सुनील राठोड, वास्‍तूविशारद संदीप ईश्‍वरे, एन्.आर्. शेंडे यांनी हा अहवाल मुख्‍यमंत्र्यांना दिला. आतंकवादी आक्रमणे, मानवनिर्मित्त आपत्ती यांमध्‍ये जीवित आणि वित्त हानी होऊ शकते, तसेच आर्थिक विकासाला त्‍याचा फटका बसतो, हे लक्षात घेऊन हे टाळण्‍याच्‍या दृष्‍टीने हा अहवाल सिद्ध करण्‍यात आला आहे.


Spread the love

Related posts

साळगाव येथील जय हिंद कॉलेज ऑफ सायन्स तर्फे वृक्ष संवर्धन व जतन उपक्रमाचे आयोजन.

news

टी-२० क्रिकेट विश्‍वचषक विजेत्या भारतीय संघाचा स्वागत सोहळ्यामुळे मुबंई महानगरपालिका हैराण.

news

सोनुर्ली प्राथमिक शाळेत घेण्यात आलेल्या या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद.

news

Leave a Comment