राजकारण

देशात अनेक ठिकाणी अंधश्रद्धेला खतपाणी घातल्या जाणाऱ्या गोष्टी घडताना दिसतात! शरद पवार…

Spread the love

सामान्य माणसाला तुकोबांच्या अभंगाचा अर्थ कळायला हवा, असं मी गाथा परिवार आणि त्यांच्या सोबतीच्या आयोजकांना सांगितलं. ते म्हणाले आम्हाला तीन महिने द्या. या कालावधीत त्यांनी प्रशिक्षण घेत उत्तम प्रकारे मांडणी केली हे आज आपण पाहिलं. आता इथंच थांबायचं नाही, हे अखंडितपणे सुरू ठेवा. त्या दृष्टीने आपली पावलं टाका, असं शरद पवार म्हणाले.

शरद पवारांनी दिला शाहू महाराजांचा संदर्भ

शाहू महाराजांचा एकाने उल्लेख केला. त्यांच्या हातातील सत्ता ही जनतेची सत्ता असा नेहमी उल्लेख केला. एकदा कर्नाटकचे ज्ञानी माणूस येत आहेत, असं त्यांना सरदारांनी सांगितलं. त्या ज्ञानी माणसाकडे उद्या काय होणार याची त्यांना कल्पना असते, तेव्हा तुम्ही त्याला भेटाच असा आग्रह सरदारांनी केला. ते ज्ञानी आले अन् म्हणाले मला पोलिसांनी पकडलं आणि मारलं. मग महाराज म्हणाले अरे तू माझं भविष्य सांगणार होता, पण तुलाच तुझी काय अवस्था होणार याची कल्पना नव्हती. मग तू माझ कसं काय भविष्य सांगणार होता? खरं तर तुला अद्दल घडवण्यासाठी मीच पोलिसांना तुझ्यासोबत असं करायला सांगितलं होतं. अशा प्रकारे शाहू महाराजांनी अंधश्रद्धा पसर पितळरवणाऱ्यांचं उघडं केलं. हेच कार्य आपल्याला करायचं आहे. हा वसा हाती घ्या असं आवाहन शरद पवार यांनी केलं. शरद पवार यांंचं आवाहन महत्त्वाचं आहे. देशात आजही अनेक ठिकाणी अंधश्रद्धेला खतपाणी घातल्या जाणाऱ्या गोष्टी घडताना दिसतात. अशा घटनांना आळा घालण्यासाठी अनेक सामाजिक संस्था काम करत आहेत. पण जोपर्यंत माणूस स्वत:हून अंधश्रद्धेला थारा देणार नाही तोपर्यंत देशात बदल घडणार नाही. त्यामुळे संत तुकोबांचा विचारांचा वारसा जपत अंधश्रद्धेला बळी न पडण्याचं आवाहन शरद पवारांनी कार्यक्रमात केलं.


Spread the love

Related posts

वर्ष २०२४ पर्यंत एकनाथ शिंदेच मुख्‍यमंत्री! चंद्रशेखर बावनकुळे

news

त्रिंबक मधील भाजप कार्यकर्त्यांनी आ.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत हाती घेतली मशाल…! भाजपमध्ये नाराजी नाट्य सुरूच.

news

कसबा आणि पिंपरी-चिंचवड या पुण्यातील दोन विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूकीचा आज निकाल

news

Leave a Comment