स्टोरी

देश के गद्दारों को गोली मारो! भाजप नेते अनुराग ठाकूर

Spread the love

२७ जानेवारी २०२० रोजी सीएए विरोधात शाहीनबागेत आंदोलन झाले होते. या आंदोलनकर्त्यांना उद्देशून भाजपा नेते अनुराग ठाकूर यांनी देशाच्या गद्दारांना गोळी मारा असं संबोधलं होतं. देश के गद्दारों को गोली मारो असं अनुराग ठाकूर म्हणाले होते. तर, प्रवेश वर्मा यांनी २८ जानेवारी २०२० मध्ये आंदोलनकर्त्यांविरोधात प्रक्षोभक भाषण केले होते.

याप्रकरणी गुन्हा दाखल होण्याकरता दंडाधिकारी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. परंतु, २६ ऑगस्ट २०२१ मध्ये दंडाधिकारी न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली होती. आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे कारण देत या याचिकेवर सुनावणी घेतली नाही. त्यामुळे हे प्रकरण दिल्ली उच्च न्यायालयात नेण्यात आलं. पंरतु, दंडाधिकारी न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास दिल्ली उच्च न्यायालायनेही नकार दिला. अखेर याचिकाकर्त्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी झाली असून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश के.एम.जोसेफ आणि बी. वी. नागरत्ना यांच्या खंडपीठाने दिल्ली सरकार आणि दिल्ली पोलिसांकडून उत्तर मागितले आहे. सीपीएप नेता बृंदा करात आणि केएम तिवारी यांच्यामार्फत ही याचिका दाखल करण्यात आली होती.

माझ्या मते गद्दार म्हणजे देशद्रोही. पण गोली मारोचा अर्थ मेडिकल प्रेस्क्रिप्शन होत नाही”, अशी टीप्पणी केली. के. एम. जोसेफ यांनी केली. तसंच, दिल्ली पोलीस आणि दिल्ली सरकारला सर्वोच्च न्यायालयाने उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.

भाजपा नेता अनुराग ठाकूर आणि प्रवेश वर्मा यांनी २०२० मध्ये केलेल्या हेट स्पीचप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकार आणि दिल्ली पोलिसांचे कान टोचले आहेत. गोली मारोचा अर्थ औषधांचे प्रिस्क्रिप्शन तर नक्कीच नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.तसंच, याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली पोलीस आणि दिल्ली सरकारकडून उत्तर मागितले आहे.


Spread the love

Related posts

पबजीतून मैत्री झालेल्‍या तरुणीचा संगमनेरमधून (अहिल्यानगर) अपहरणाचा प्रयत्न!

news

यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न, जिद्द व चिकाटी गरजेची..! प्रा. रुपेश पाटील

news

सह्याद्री फाउंडेशनच्या मान्सून महोत्सव २०२३ ची आजपासून सुरुवात!

news

Leave a Comment