Uncategorizedस्टोरी

देशातील कारागृहांमधील ७७ टक्के बंदीवानांवरील खटले प्रलंबित!

Spread the love

सिंधुदुर्ग: देशातील कारागृहांतील केवळ २२ टक्के बंदीवानांवरचेच गुन्हे सिद्ध झाल्याने ते शिक्षा भोगत आहेत, तर ७७ टक्के बंदीवानांवरील खटले प्रलंबित असल्याने ते अद्यापही कारागृहांत बंद आहेत. ही माहिती ‘इंडिया जस्टिस’च्या अहवालामधून समोर आली आहे. वर्ष २०१० मध्ये ही संख्या २ लाख ४० सहस्र होती, ती वर्ष २०२१ मध्ये दुपटीने वाढून ४ लाख ३० सहस्र झाली आहे, म्हणजेच यात ७८ टक्के वाढ झाली आहे. अधिक काळ कारागृहांत राहिल्याने होणारा परिणाम !
या अहवालात म्हटले आहे की, खटले प्रलंबित असणार्‍या बंदीवानांना दीर्घकाळ कारागृहांत ठेवल्याने हे दिसून येते की, खटला संपायलाही फार वेळ लागत आहे. यामुळे केवळ प्रशासकीय काम वाढत नसून प्रत्येक बंदीवानावर होणारा व्यय (खर्च) यामुळे वाढत आहे. याचा भार सरकारी तिजोरीवर पडतो


Spread the love

Related posts

इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडीच्या वतीने नगरपरिषदेच्या ६० सफाई कामगारांना स्वेटर आणि मिठाई वाटप.

news

जागतिक महिलादिनानिमित्त महिला पत्रकारांचा झाला सन्मान..!

news

मालवणात शिवसेनेच्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद…!

news

Leave a Comment