सावंतवाडी: सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाळ्यापूर्वी वीज विभागाच्या असंख्य समस्या असुन जिल्हा वासियांना अवकाळी पावसामुळे वीज विभागाच्या सेवेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पावसाळ्यात सेवा देण्यास वीज विभाग सक्षम नाही. त्यामुळे सोमवार दिनांक २५ मे रोजी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत जिल्हा अधिक्षक अभियंता कुडाळ कार्यालयात जाब विचारण्यासाठी तमाम विज ग्राहकांनी लेखी तक्रारसह उपस्थित राहावे. असे आवाहन सिंधुदुर्ग वीज ग्राहक संघटना जिल्हाध्यक्ष संजय लाड, समन्वयक ॲड.नंदन वेंगुर्लेकर, सोशल मिडिया प्रमुख मनोज घाटकर यांनी आवाहन केले आहे.
