स्टोरी

युद्धजन्य परिस्थितीत युवकांनी केलाविजयाचा संकल्प: हनुमान जयंतीला सामूहिक गदापूजन..! रामराज्य स्थापनेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४२ठिकाणी सामूहिक ‘गदापूजन’ संपन्न!

Spread the love

सिंधुदुर्ग : “आज संपूर्ण जग युद्धजन्य परिस्थितीच्या उंबरठ्यावर उभे आहे. इतिहासाचे अवलोकन केल्यास लक्षात येते की, युगानुयुगे ज्या युद्धात मारुतिराय विराजमान झाले, तिथे विजय निश्चित झाला आहे! मग ते प्रभू श्रीरामांच्या सैन्यात राहून रावणाच्या लंकेचे दहन करणारे मारुतिराय असोत,वा महाभारतात अर्जुनाच्या रथावर ध्वजस्तंभावर विराजमान होऊन अधर्माविरुद्ध पांडवांना बळ देणारे हनुमान असोत! इतकेच नव्हे, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘हिंदवी स्वराज्या’साठी समर्थ रामदास स्वामींनी गावोगावी मारुतीरायांची मंदिरे स्थापून जी बलोपासना सुरू केली, त्यातूनच स्वराज्याला आध्यात्मिक आणि सामर्थ्याचे बळ मिळाले. आज पुन्हा एकदा देश आणि धर्म संकटात असून सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. अशा काळात प्रत्येक हिंदूमध्ये मारुतीरायांसारखे शौर्य,शक्ती आणि भक्ती जागृत व्हावी अन् येणाऱ्या भीषण आपत्काळात मारुतीरायांच्या आशीर्वादाने हिंदूंचा विजय सुनिश्चित व्हावा, याच संकल्पनेतून श्री हनुमान जयंतीच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ८५० हून अधिक ठिकाणी, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४२ ठिकाणी सामूहिक ‘गदापूजन’ करण्यात आले. गदापूजनात एकूण सुमारे ७०० धर्मप्रेमींनी सहभाग घेतला.

गदापूजन’ विधी, श्री हनुमानाची आरती, मारुति स्तोत्रपठण, शंखनाद आणि सामूहिक प्रार्थना केल्यानंतर ‘श्री हनुमते नम:’ हा सामूहिक नामजप या गदापूजन कार्यक्रमात करण्यात आले. या वेळी ‘रामराज्याच्या स्थापनेसाठी मारुतीरायांचे गुण कसे आत्मसात करावेत’ याविषयी मार्गदर्शनही करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी ‘रामराज्याच्या स्थापनेसाठी सामूहिक प्रतिज्ञा’ घेण्यात आली. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात गेली ४ वर्ष सामूहिक ‘गदापूजन’कार्यक्रम यशस्वीपणे घेण्यात येत आहेत आणि यावर्षीही हिंदुत्वनिष्ठ आणि भाविक यांचा उत्तम सहभाग यात दिसून आला. यावेळी विविध हिंदुत्ववादी संघटनांचे प्रतिनिधी सुद्धा सहभागी झाले होते. आपला नम्र,श्री.संजय जोशीहिंदू जनजागृति समिति, सिंधुदुर्ग(संपर्क- 89832 65759)


Spread the love

Related posts

आ. वैभव नाईक यांनी महादेवाचे केरवडे येथे भेट देत फाले कुटूंबीयांकडे अर्थसहाय्य मंजुरीचे पत्र केले सुपूर्द…!

news

आडेली झाराप साळगाव माणगाव या ४७ लाखाच्या रस्त्याचे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते झाले भूमिपूजन.

news

नागपूरमध्ये शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत दोघांचा मृत्यू

news

Leave a Comment