स्टोरी

वयाच्या पंचवीसाव्या वर्षीच पोरं “EMI” या तीन अक्षरांच्या साखळीत अडकतात..! ज्योती मयेकर .

Spread the love

“जगलो कधी खरं?”

वयाच्या पंचवीसाव्या वर्षीच पोरं “EMI” या तीन अक्षरांच्या साखळीत अडकतात. फ्लॅट घेतो, कार घेतो — आणि त्याच क्षणापासून आयुष्याचं मोकळं आकाश बँकेच्या हप्त्यांत बंदिस्त होतं. सकाळ ऑफिस, संध्याकाळ थकवा, आणि मध्ये ‘स्वप्नं राखाडी’. पगार वाढतो, पण शांती कमी होत जाते. फेसबुकवर हसू कायम असतं, पण मनात रिक्तता.

स्वप्नातील घर की ओझ्याचं घर?

घर घेतलं, त्यातल्या भिंती हप्त्यांच्या भीतीने थरथरतात. वाटतं — “आपलं काहीतरी झालंय” पण प्रत्यक्षात आपणच कुणाचं तरी झालेलो असतो — बँकेचं, कंपनीचं, आणि जबाबदाऱ्यांचं.

लग्न — प्रेमाचा विस्तार की खर्चाचा प्रारंभ?

एक दिवस येतो, जेव्हा एखादी मुलगी आयुष्यात येते. आपण तिच्यासाठी, तिच्या हसण्यासाठी, जग हलवायचा प्रयत्न करतो. पण काही वेळा, ती मुलगी त्या घराची होत नाही…आणि त्या व्यक्तीचीही होत नाही. तेव्हा एकेक स्वप्न विकावं लागतं. कधी कार विकावी लागते, कधी घर… कधी माणसं सोडावी लागतात…. कधी आई-वडिलांपासून दूर जावं लागतं आणि शेवटी मनाचं घर रिकामं राहतं.

प्रश्न उरतो — चूक नेमकी कुणाची?

समाजाची की आपल्या घाईची? आयुष्याच्या सुरुवातीलाच आपण “स्थैर्य” शोधतो —पण स्थैर्य म्हणजे थांबणं नाही, ते म्हणजे शांततेचा प्रवाह. आपण घर बांधतो, पण स्वतःचं मन विसरतो. आपण लग्न करतो, पण प्रेम हरवतो, नम्रता हरवतो. आपण जगतो, पण जगणं थांबतं. आणि शेवटी दवाखान्याच्या बेडवर पडून मन विचारतं “ आपण जगलो कधी खरं खरं ?” “हे आयुष्य माझं होतं का, की फक्त बँकेचं, समाजाचं, आणि परिस्थितीचं?”

संदेश 👇

आयुष्याचं सौंदर्य “मिळवण्यात” नाही, तर “जगण्यात” आहे. घर, कार, लग्न — सगळं आवश्यक आहे,. पण स्वतःचा आतला माणूस टिकवणं त्याहून महत्त्वाचं आहे. विचार करा आणि पावलं उचला!

लेखक:- ज्योती मयेकर 


Spread the love

Related posts

गोळवण शाळा नं. १ येथे वाय-फाय सुविधा कार्यान्वित.

news

३० डिसेंबर २०२३ पर्यंत श्रीरामाची पुजाअर्चा करता येईल! अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा

news

कोकण रेल्वे मध्ये अडकून पडलेल्या सिंधुदुर्गातील प्रवाशांना शिक्षण मंत्री दीपक केसरकरांकडून जेवण आणि पाण्याची व्यवस्था.

news

Leave a Comment