स्टोरी

दिवसाची सुरुवात चांगल्या विचारांनी! जय जय रघुवीर समर्थ! श्लोक क्रमांक ८ आणि अर्थ.

Spread the love

देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी!

मना सज्जना हेची क्रिया धरावी!

मना चंदनाचेपरी त्वां झिजावे!

परी अंतरी सज्जना नीववावे ||८||

अर्थ: मरण पावल्यानंतर आपली सुकीर्ती मागे उरायला हवी असेच वर्तन, हे सज्जन मना, नेहमी ठेवावे. तू चंदनासारखे झिजावेस आणि सज्जन लोकांना समाधान द्यावेस. जन्माला आला, जगला, मेला. कुणाच्या आठवणीतही राहिला नाही असलं जीवन जगण्यात काय अर्थ? माणसानं असं जगलं पाहिजे की मेल्यानंतरदेखील त्याची सत्कीर्ति दिगंत पसरलेली रहावी. स्मारकातून, पुतळ्यातून नाही तर त्याच्या कर्तृत्वाच्या आठवणीतून तो मागे उरायला हवा. सज्जनहो, हे मनोमन समजून घ्या आणि तसं होण्यासाठीची वर्तणूक ठेवा. चंदन उगाळलं जात असताना घासून घासून झिजतं, पण उगाळणाऱ्या हातालादेखील सुगंधित करून जातं. तसं तुम्ही मनानं असावं. जगात खरोखरीचे सज्जन, गुणीजन असतात त्यांना तुम्ही आपले आहात. असे प्रेमाचे, आदर करण्यासारखे वाटायला हवे. असे वर्तन ठेवा, त्यांना आनंद, समाधान द्या.


Spread the love

Related posts

मांडकुली- तेर्सेबांबर्डे मळावाडी येथे पूल बांधण्याचा आ. वैभव नाईक यांनी दिलेला शब्द केला पुर्ण

news

श्री देव लिंगेश्वर आधी पंचायतन देवस्थान आजपासून कलंबिस्त धामणमळा येथील कुलदैवत श्री देवी सातेरी च्या भेटीला…..

news

भूसंपादन आणि नुकसान भरपाईसंदर्भात सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष मोहन वाडकर यांचे १५ ऑगस्ट रोजी होणारे उपोषण तूर्त स्थगित.

news

Leave a Comment