स्टोरी

दिवसाची सुरुवात चांगल्या विचारांनी! जय जय रघुवीर समर्थ! श्लोक क्रमांक ८ आणि अर्थ.

Spread the love

देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी!

मना सज्जना हेची क्रिया धरावी!

मना चंदनाचेपरी त्वां झिजावे!

परी अंतरी सज्जना नीववावे ||८||

अर्थ: मरण पावल्यानंतर आपली सुकीर्ती मागे उरायला हवी असेच वर्तन, हे सज्जन मना, नेहमी ठेवावे. तू चंदनासारखे झिजावेस आणि सज्जन लोकांना समाधान द्यावेस. जन्माला आला, जगला, मेला. कुणाच्या आठवणीतही राहिला नाही असलं जीवन जगण्यात काय अर्थ? माणसानं असं जगलं पाहिजे की मेल्यानंतरदेखील त्याची सत्कीर्ति दिगंत पसरलेली रहावी. स्मारकातून, पुतळ्यातून नाही तर त्याच्या कर्तृत्वाच्या आठवणीतून तो मागे उरायला हवा. सज्जनहो, हे मनोमन समजून घ्या आणि तसं होण्यासाठीची वर्तणूक ठेवा. चंदन उगाळलं जात असताना घासून घासून झिजतं, पण उगाळणाऱ्या हातालादेखील सुगंधित करून जातं. तसं तुम्ही मनानं असावं. जगात खरोखरीचे सज्जन, गुणीजन असतात त्यांना तुम्ही आपले आहात. असे प्रेमाचे, आदर करण्यासारखे वाटायला हवे. असे वर्तन ठेवा, त्यांना आनंद, समाधान द्या.


Spread the love

Related posts

आमदार जितेंद्र आव्हाड यांचे माजी अंगरक्षक पोलीस हवालदार वैभव कदम यांनी केली आत्महत्या?

news

श्री जरी मरी आईआई नवरात्र उत्सव मंडळ भेंडखळ तर्फे श्री गणेशोत्सव २०२३ आरास स्पर्धेचे बक्षीस वितरण उत्साहात संपन्न.

news

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत दाखल! मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केलं स्वागत….

news

Leave a Comment