स्टोरी

तुळस गावात गेले तीन दिवस विजपुरवठा खंडित.

Spread the love

वेंगुर्ला (तुळस):  गेले तीन दिवस वेंगुर्ला तालुक्यातील तुळस गावात वीज पुरवठा खंडित झालेला आहे. गावातील वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांचे गैर होत आहे. आज महावितरण च्या अधिकाऱ्यांना याबाबत नागरिकांनी जाऊन जाब विचारलला असता नेमका अडथळा कुठे आहे? हे समजत नाही. तसेच याबाबत काम चालू आहे. अशी उत्तरे दिली जातात. मात्र या सर्व प्रकारामुळे ग्रामस्थांची गैरसयवत आहे.

जर आज संध्याकाळ पर्यंत लाईट आली नाही तर तुळस गावच्या च्या वतीने धडक मोर्चा काढण्यात येईल. अशी माहिती ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते नारायण कुंभार यांनी दिली आहे. तशी समज हि महावितरण च्या अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. यावेळी शेतकरी संघटनाचे अध्यक्ष तुषार राय, ग्रामपंचायत सदस्य नारायण कुंभार, विद्या माळकर, आबा परब, गावडे आणि तुळस  गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.


Spread the love

Related posts

पनवेलकर कुटुंबियांची वारकरी दिंडी विविध उपक्रमांनी संपन्न…!

news

नेरुर येथील राजा तवटे यांना श्री लक्ष्मीनारायण संस्थेतर्फे १० हजार रुपयाची आर्थिक मदत.

news

जासई हायस्कूलमध्ये कर्मवीर जयंती निमित्त पालखी सोहळा संपन्न.

news

Leave a Comment