स्टोरी

‘वन्दे भारत एक्सप्रेस’ आठवड्यातून ६ दिवस धावणार कोकण रेल्वे मार्गावर १ नोव्हेंबरपासून उन्हाळी वेळापत्रक लागू होणार

Spread the love

२५ ऑक्टोबर वार्ता: सद्य:स्थितीत मुंबई ते मडगाव कोकण रेल्वेमार्गावर धावणारी ‘वन्दे भारत एक्सप्रेस’ आठवड्यातील ३ दिवस चालवली जात आहे. या गाडीला प्रवाशांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत ही गाडी आठवड्यातून ६ दिवस धावणार आहे. कोकण रेल्वेचे उन्हाळी वेळापत्रक लागू करण्यात आल्यानंतर हा निर्णय घेण्यात येणार आहे.

 

१ नोव्हेंबरपासून रेल्वेसाठी उन्हाळी वेळापत्रक लागू होणार. कोकण रेल्वे मार्गावर १ नोव्हेंबरपासून उन्हाळी वेळापत्रक लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वेगाड्यांचा वेग वाढणार आहे. उन्हाळी वेळापत्रकानुसार मुंबई-गोवा मार्गावर काही रेल्वेगाड्यांना ताशी १०० ते १२० कि.मी. वेगाला संमती देण्यात आली आहे.


Spread the love

Related posts

आनंदवाडी ग्रामस्थ मंडळ मुंबई यांचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.

news

सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ले तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यावर सापडला पाण्यावर तरंगणारा ‘प्युमिस’ दगड

news

रिफायनरी विरोधक आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यात जवळपास अर्धा तास चर्चा!

news

Leave a Comment