स्टोरी

‘वन्दे भारत एक्सप्रेस’ आठवड्यातून ६ दिवस धावणार कोकण रेल्वे मार्गावर १ नोव्हेंबरपासून उन्हाळी वेळापत्रक लागू होणार

Spread the love

२५ ऑक्टोबर वार्ता: सद्य:स्थितीत मुंबई ते मडगाव कोकण रेल्वेमार्गावर धावणारी ‘वन्दे भारत एक्सप्रेस’ आठवड्यातील ३ दिवस चालवली जात आहे. या गाडीला प्रवाशांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत ही गाडी आठवड्यातून ६ दिवस धावणार आहे. कोकण रेल्वेचे उन्हाळी वेळापत्रक लागू करण्यात आल्यानंतर हा निर्णय घेण्यात येणार आहे.

 

१ नोव्हेंबरपासून रेल्वेसाठी उन्हाळी वेळापत्रक लागू होणार. कोकण रेल्वे मार्गावर १ नोव्हेंबरपासून उन्हाळी वेळापत्रक लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वेगाड्यांचा वेग वाढणार आहे. उन्हाळी वेळापत्रकानुसार मुंबई-गोवा मार्गावर काही रेल्वेगाड्यांना ताशी १०० ते १२० कि.मी. वेगाला संमती देण्यात आली आहे.


Spread the love

Related posts

मानवी शरीर म्हणजे परमेश्वराची चालती बोलती जीवंत मूर्ती होय…! सद्गुरू श्री वामनराव पै.

news

ओटवणे सरपंच आत्माराम गावकर यांनी आपल्या अधिकारांचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांच्यावर नियमोचित कारवाईची मागणी.

news

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गाजलेला पहिला मालवणी चित्रपट “भेरा” २८ फेब्रुवारीपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार.

news

Leave a Comment