स्टोरी

सियाचीन येथील सैन्य तळावर वीरमरण आलेले अक्षय लक्ष्मण गावते हे पहिले ‘अग्नीवीर’ !

Spread the love

२३ ऑक्टोबर वार्ता: जगातील सर्वांत उंच सैन्य तळ असलेल्या सियाचीन येथे तैनात भारतीय सैनिक अक्षय लक्ष्मण गावते यांना वीरमरण आले. देशासाठी प्राणार्पण करणारे ते पहिले ‘अग्नीवीर’ झाले आहेत. अक्षय हे भारतीय सैन्यातील ‘फायर अँड फ्यूरी’ या विभागात कार्यरत होते. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकलेले नाही.काराकोरम पर्वतरांगेत जवळपास २० सहस्र फूट उंचीवर असलेल्या सियाचीन हिमनदीच्या परिसरात जगातील सर्वांत उंच सैन्य तळ आहे. येथे भारतीय सैनिकांना प्रचंड थंड वातावरणाला तोंड द्यावे लागते. जून मासात आग लागण्याच्या कारणावरून येथील सैन्य तळावर एका सैनिकाचा मृत्यू झाला होता, तर ३ सैनिक घायाळ झाले होते.

 

‘अग्नीवीर’ ही भारतीय सैन्यात सैनिकांची ४ वर्षांसाठी भरती करण्यासाठीची शासनाची योजना असून यांतर्गत केवळ सैनिकांची नियुक्ती केली जाते. यात सैन्याधिकार्‍यांचा समावेश नसतो. या योजनेच्या अंतर्गत तैनात सैनिकांना ‘अग्नीवीर’ नावाने संबोधित केले जाते.


Spread the love

Related posts

अक्कलकोट श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात श्री दत्त जयंती सोहळा…!

news

घावनळे विभागात विकास कामांचा धडाका…!आ. वैभव नाईक यांनी मंजूर केलेल्या विविध विकास कामांची भूमिपूजने.

news

सह्याद्री फाउंडेशनच्या वतीने ‘मान्सून महोत्सवाचे’ आयोजन!

news

Leave a Comment