स्टोरी

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा मालवण येथील ‘राजकोट’ किल्ल्यावर उभारण्यात येणार !

Spread the love

मालवण: डिसेंबर मासात सिंधुदुर्ग किल्ल्यावर ‘नौसेना दिन’ साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने सिंधुदुर्ग किल्ल्यावर उभारण्यात येणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आता येथील ‘राजकोट’ या किल्ल्यावर उभारण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या रक्षणासाठी बांधण्यात आलेल्या ‘राजकोट’ किल्ल्याची या निमित्ताने पुनर्बांधणी होणार आहे. शिवप्रेमींसाठी ही आनंदाची गोष्ट आहे, अशी माहिती पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी येथील ‘हॉटेल ऐश्वर्य’ येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.या वेळी अवि सामंत, रवींद्र खानविलकर, मंगेश जावकर, सहदेव बापर्डेकर, भूषण साटम, सुरेश बापर्डेकर, अभय पाटकर, सहदेव साळगावकर, शेखर गाड, दर्शन वेंगुर्लेकर, तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.या वेळी मोंडकर म्हणाले, ‘‘सिंधुदुर्ग किल्ल्याची उभारणी केल्यानंतर त्याचे रक्षण करण्यासाठी मालवण किनारपट्टीवर पद्मगड, राजकोट आणि सर्जेकोट हे किल्ले बांधण्यात आले. मालवणच्या किनार्‍यावर उत्तरेकडे खडकाळ आणि काहीसा उंच भाग आहे. या जागी ‘राजकोट’ किल्ला बांधण्यात आला होता. आता ढासळत चाललेल्या ‘राजकोट’ किल्ल्याची ३५० वर्षांनंतर पुनर्बांधणी, तसेच या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात येणार असल्याने हा क्षण समस्त शिवप्रेमींसाठी अभिमानास्पद आहे.’’


Spread the love

Related posts

माजी गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील केतनकुमार गावडे यांनी भेट घेतली! गटनेतेपदी नियुक्ती झाल्याबद्दल दिल्या शुभेच्छा .

news

मोती तलावात उडी घेतलेल्या मुलीची माहिती मिळवण्यात पोलिसांना यश.

news

झाडावर चढून मध काढतांना तोल जाऊन खाली पडल्याने ३९ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू.

प्रसाद परब

Leave a Comment