स्टोरी

लव्ह जिहादपासून हिंदू भगिनींचे रक्षण हे खरे रक्षाबंधन ! काजल हिंदुस्थानी

Spread the love

रक्षाबंधनाला कॅडबरीची नाही, तर स्वसंरक्षणासाठी प्रोत्साहित करण्याची आवश्यकता ! – काजल हिंदुस्थानी,प्रखर हिंदुत्वनिष्ठ….

 

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: हिंदूंच्या मुलींना फसवून पळवून आपल्या जनानखान्यात डांबणार्‍यांना हिंदु जावई नको आहे, असे नॅरेटिव्ह स्थापित केले जात आहे. हिंदु मुलगी मुसलमानाला पत्नी म्हणून चालते; परंतु मुसलमान युवतीने हिंदु मुलावर प्रेम केले, तर त्याचा जीव का घेतला जातो? तेव्हा तथाकथित ‘भाईचारा’ कुठे जातो? जो धर्मांध आपल्या सख्ख्या बहिणीसोबत विवाह करणे चुकीचे मानत नाही, त्याला आपल्या घरात घेताना हिंदु बांधवांनी दहा वेळा विचार करावा. आतापर्यंतच्या घटनांमधून ‘लव्ह जिहाद्यां’ची मानसिकता ओळखा आणि आपल्या परिवाराला वाचवा. आता हिंदु भगिनीला रक्षाबंधनाला कॅडबरीची नाही, तर स्वसंरक्षणासाठी प्रोत्साहित करण्याची आवश्यकता आहे,असा संदेश प्रखर हिंदुत्वनिष्ठ काजल हिंदुस्थानी यांनी रक्षाबंधनाच्या निमित्ताने दिला. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘लव्ह जिहादपासून हिंदू भगिनींचे रक्षण, हे खरे रक्षाबंधन!’ या विषयावर आयोजित विशेष संवादात त्या बोलत होत्या. हिंदु जनजागृती समितीचे मुंबई प्रवक्ते श्री. सतीश कोचरेकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

 

काजल हिंदुस्थानी पुढे म्हणाल्या की, उच्चशिक्षित चांगल्या घरातील हिंदु मुली भंगार गोळा करणार्‍या, पंक्चरवाल्या मुसलमान युवकांसोबत पळून जातात. अशा घटनांमागे बॉलिवूडमधून देण्यात येणारे ‘सॉफ्ट पॉयझन’ कारणीभूत आहे. अशा युवती बॉलिवूडमधील आंतरधर्मीय विवाह करणार्‍या अभिनेत्रींना आदर्श मानतात. त्यामागील काळी बाजू समजत नाही. ‘शाहरूख’ची गौरी होण्याचा प्रयत्न करतात; पण त्यांना हे समजत नाही त्यांचा ‘शाहरूख’ पंक्चर काढणारा असतो. आज धर्मांधांना हिंदू युवतींना फसवून आणण्याचे प्रशिक्षण दिले जाते. त्यासाठी पैसा ओतला जातो. हिंदु युवकांना मंदिराचा पुजारी असे काही सांगत नाही. हिंदु युवती भ्रमित होण्यामागे बॉलिवूड, सोशल मीडिया, ओटीटी प्लॅटफॉर्म आणि टीव्हीवरील जाहिराती कारणीभूत ठरत आहेत.

 

त्या पुढे म्हणाल्या की, आज आपल्या मंदिरांमधून हिंदूंना धर्मशिक्षण देण्याची व्यवस्था नाही; मात्र मदरशांतून धर्मासह लढण्याचेही प्रशिक्षण दिले जाते. आपल्याला अहिंसेचा अतिरेक करण्याचे बाळकडू देऊन तेजहिन करण्याचे कारस्थान चालू आहे. आज विविध प्रकारच्या जिहादसाठी मौलानांना पैसा पुरवठा होत आहे; तर हिंदु धर्मीयांनी मंदिरांना दिलेला निधी सरकार पळवत आहे. अशामुळे हिंदु समाज कमकुवत झाला आहे. हिंदु समाजाचे जेवढे नुकसान मोगल आणि ब्रिटीश यांनी केले नसेल, तेवढे काँग्रेसी, सेक्युलरवादी सरकारांसह कम्युनिस्ट इतिहासकार आणि ख्रिस्ती शिक्षणपद्धतीने केले आहे. या संदर्भात हिंदु संघटनांना घरोघर जाऊन प्रबोधन करण्याची आवश्यकता आहे. हिंदू बांधवांनाही कोणत्या ना कोणत्या हिंदु संघटनेशी जोडून घ्यावे लागेल. वयात येणार्‍या मुलींमध्ये हार्मोनल चेंजेस होत असल्याने त्या भावनिक आणि संवेदनशील होतात; म्हणून मिहला संघटनांनी प्रत्येक महिन्यात एकदा तरी शाळांमध्ये जाऊन 12-13 वर्षीय मुलींचे ‘लव्ह जिहाद’च्या धोक्याबाबत प्रबोधन केले पाहिजे, असे आवाहनही काजलजींनी केले.


Spread the love

Related posts

श्री देव मल्लनाथ महिला बचत गटातील १३ महिलांना डॉ. चंद्रकांत सावंत यांनी दिली ५०० रुपयाची भाऊबीज भेट…..

news

मसुरे परिसरात शनिवारची रात्र नरकासुरांची!

news

टोलवसुली’ हा महाराष्ट्रातील सर्वांत मोठा घोटाळा ! – राज ठाकरे

news

Leave a Comment