स्टोरी

जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीत भारतीय जवानांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान.

Spread the love

श्रीनगर: जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील बरियामा येथे भारतीय सैन्य आणि आतंकवादी यांच्यात चालू असलेल्या चकमकीत २ आतंकवादी ठार झाले. गेल्या ३ दिवसांत जम्मू-काश्मीरमध्ये सैनिक आणि आतंकवादी यांच्यात झालेली ही तिसरी चकमक आहे.५ ऑगस्टला राजौरीतील खवास भागात झालेल्या चकमकीत १ आतंकवादी मारला गेला होता. कुलगाममध्ये ४ ऑगस्टला सायंकाळी सैनिक आणि आतंकवादी यांच्यात झालेल्या चकमकीत ३ सैनिकांना वीरगती प्राप्त झाली होती. अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार कुलगामच्या हलान जंगलात आतंकवाद्यांनी सैन्याच्या तंबूवर गोळीबार केला.


Spread the love

Related posts

दांडी आणि चिवला बीचवर सापडलेले ते “अंबरग्रीस, नसून पॉली ऍनाईल क्लोराईड पदार्थ! पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांची माहिती

news

सिंधुदुर्गातील दोन सुपुत्रांना कृषी क्षेत्रातील संशोधनाबद्दल मानद डॉक्टरेट.!

news

मुंबई-गोवा महामार्गाच्या समस्येविषयी मनसेकडून रत्नागिरीत जनजागृती !

news

Leave a Comment