स्टोरी

जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीत भारतीय जवानांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान.

Spread the love

श्रीनगर: जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील बरियामा येथे भारतीय सैन्य आणि आतंकवादी यांच्यात चालू असलेल्या चकमकीत २ आतंकवादी ठार झाले. गेल्या ३ दिवसांत जम्मू-काश्मीरमध्ये सैनिक आणि आतंकवादी यांच्यात झालेली ही तिसरी चकमक आहे.५ ऑगस्टला राजौरीतील खवास भागात झालेल्या चकमकीत १ आतंकवादी मारला गेला होता. कुलगाममध्ये ४ ऑगस्टला सायंकाळी सैनिक आणि आतंकवादी यांच्यात झालेल्या चकमकीत ३ सैनिकांना वीरगती प्राप्त झाली होती. अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार कुलगामच्या हलान जंगलात आतंकवाद्यांनी सैन्याच्या तंबूवर गोळीबार केला.


Spread the love

Related posts

राज्यात विविध भागांत मान्सून सक्रिय!

news

विविध प्रश्नांबाबत आ. वैभव नाईक उद्या घेणार जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट

news

सावरवाड ते कलंबिस्त, शिरशिंगे ते गोठवेवाडी रस्त्याकडे प्रशासनाचे आणि ठेकेदाराचे दुर्लक्ष..!

news

Leave a Comment