स्टोरी

होमगार्ड्सना सलग सहा महिने काम दिले जाईल! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

Spread the love

२८ जुलै वार्ता: होम गार्डना आता सलग सहा महिने काम दिलं जाणार आहे आणि त्यासाठी ३५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच दर तीन वर्षांनी केली जाणारी त्यांची नोंदणी आता बंद करण्यात येईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. सरकारच्या या निर्णयाचा फायदा राज्यातील हजारो होमगार्डना होणार आहे. होमगार्ड ही स्वेच्छित सेवा आहे. इतर राज्यात १८० दिवस काम दिले जाते. पण आपल्या राज्यात दिले जात नाही. माझ्या सरकारच्या काळात आपण १८० दिवस लागू केले, पण आर्थिक अडचणीमुळे हे परत थांबवले गेले. होमगार्डची खूप मदत होते, त्यामुळे आता ३५० कोटी रुपयांची तरतूद करुन होमगार्ड्सना सलग सहा महिने काम दिले जाईल. होमगार्डच्या सेवेसाठी १७५ कोटींची मर्यादा घालण्यात आली होती ती आता बंद करण्यात आली आहे. होमगार्डसाठी दर तीन वर्षांनी केली जाणारी नोंदणी बंद करण्यात येत आहे. होमगार्डना कवायत भत्ता देखील मंजूर केला आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.


Spread the love

Related posts

सावंतवाडी शहरातील पाणी टंचाई प्रशासन निर्मित!

news

रेवंडी येथील जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेमध्ये गुरुनाथ तुळसकर आणि सायली राऊळ संयुक्त विजेत्या.

news

आजच्या डिजिटल युगात संस्कारित मुलं घडवण्यासाठी मार्गदर्शक ठरणाऱ्या सुप्रसिद्ध लेखक मनोज अंबिके यांनी लिहिलेली आणि बेस्टसेलर ठरलेली चार पुस्तकं

news

Leave a Comment