स्टोरी

वारकऱ्यांना मिळणार विमा संरक्षण!

Spread the love

२१ जून वार्ता: आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला दरवर्षी लाखो वारकरी वारीत सहभागी झाले होतात. यावर्षीही लाखो वारकरी वारीत सहभागी झाले आहेत. वारकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून वारकऱ्यांना विमा संरक्षण देण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं आहे. सरकारच्या खर्चातून हे विमा संरक्षण देण्यात येणार आहे. वारीच्या ३० दिवसांसाठी हे विमा संरक्षण लागू असणार आहे. यामध्ये एखाद्या वारकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांस ५ लाख रुपये, दुर्घटनेत कायमचे अपंगत्व किंवा विकलांगता आल्यास १ लाख रुपये, अंशत: अपंगत्व आल्यास ५० हजार रुपये आणि वारीच्या दरम्यान आजारी पडल्यास औषधोपचारासाठी ३५ हजार रुपयापर्यंतचा खर्च मिळणार आहे.


Spread the love

Related posts

उद्या कल्याण पूर्वेत ‘संविधान गौरव’ स्पर्धा परिक्षेचे आयोजन!सर्व प्रवर्गातील उच्छुकांना स्पर्धेत भाग घेण्याची सुवर्ण संधी

news

कलंबिस्त ग्रामपंचायत व दुग्ध व्यवसाय सहकारी संस्था आयोजित महाआरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…!

news

निलेश सांबरे यांच्या जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे कार्य आदर्शवत व दिशादर्शक! अँड. नकुल पार्सेकर

news

Leave a Comment