स्टोरी

उकाड्यामुळे शाळा एक आठवडा पुढे ढकलण्याची काही पालकांची मागणी!

Spread the love

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: नवीन शैक्षणिक वर्षाला ५ जूनपासून प्रारंभ झाला. दोन मासांच्या सुटीनंतर विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने वर्गांमध्ये उपस्थिती लावली. कुजिरा, बांबोळी येथील शाळांमध्ये पहिल्याच दिवशी वर्गात येणार्‍या विद्यार्थ्यांचे शिक्षकांनी औक्षण करून स्वागत केले. शाळेचा पहिलाच दिवस असल्याने अनेक शाळा लवकर सुटल्या. पालकांनी मुलांना शाळेत सोडायला ठिकठिकाणी गर्दी केली होती. पणजी परिसरात रस्त्यांच्या डागडुजीचे काम चालू असल्याने अनेकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला, तसेच मडगाव येथेही अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी दिसून आली.

गोवा सरकारने यंदाच्या शैक्षणिक वर्षी पूर्वप्राथमिक आणि प्राथमिक स्तरांपासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथमच शाळेत जाणारा आणि वयाची ३ वर्षे पूर्ण झालेला मुलगा किंवा मुलगी यांच्यासाठी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबवणारी शाळा ५ जुलै या दिवशी चालू होणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण त्यापुढील वर्गांसाठी टप्प्याटप्प्याने लागू केले जाणार असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.पावसाच्या आगमनाला विलंब होत असल्याने आणि उकाड्यामुळे शाळा अन् उच्च माध्यमिक शाळा एक आठवड्याने पुढे ढकलण्याची मागणी सावईवेरे येथील पालकवर्गाने केली आहे. पालकांच्या मते, ‘‘पालकांनाच उकाडा असह्य होत असतांना पाल्यांनाही प्रसन्न वातावरणात शिकता येणार नाही. सध्याचे दिवसाचे तापमान ३५ अंश सेल्सियसपेक्षाही अधिक असते. यामुळे सरकारने शाळा एक आठवडा विलंबाने चालू करावी.’’


Spread the love

Related posts

आरोपपत्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्राजक्त तनपुरेंसह १४ नावांचा समावेश !

news

निवती बंदर येथे ३ मार्च रोजी खुल्या रेकाॅर्ड डान्स स्पर्धा! विठ्ठल रखुमाई मंदिराच्या २३ व्या वर्धापनदिना निमित्त आयोजन.

news

योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन’ पुरस्काराचे वितरण -पू. (डॉ.) दीपक जोशी, अभिराज मुळे आणि सागर पागोरे हे पुरस्कारार्थी!

news

Leave a Comment