स्टोरी

ओडिशाच्या बालासोर येथे झालेल्या कोरोमंडल ट्रेन अपघातात २३३ प्रवाशांचा मृत्यू….

Spread the love

३ जून वार्ता: ओडिशाच्या बालासोर या ठिकाणी झालेल्या कोरोमंडल ट्रेन अपघातात २३३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर ९०० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. या घटनेविषयी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शोक व्यक्त केला आहे. अपघाताची माहिती मिळताच एनडीआरएफच्या पथकांनी अपघात स्थळी जाऊन मदत आणि बचाव कार्य सुरु केलं आहे. बहनागा बाजार स्टेशन परिसर हा किंकाळ्या, रडणं, हुंदके, जखमी लोक सगळं रात्रभर त्या परिसरात होतं. एनडीआरएफ ने बोगींच्या मध्ये चिकटेलेले मृतदेह काढण्यासाठी एनडीआरएफला गॅस कटरचा वापर करावा लागला. आत्ताही मदत आणि बचावकार्य सुरु आहे. आता लष्करानेही या मदत आणि बचाव कार्यात भाग घेतला आहे. त्यांच्याकडूनही जखमींना मदत केली जाते आहे.


Spread the love

Related posts

आ. वैभव नाईक यांनी कुटूंबासमवेत बजावला मतदानाचा हक्क.

news

अधिवक्‍ते गुणरत्न सदावर्ते यांची सनद २ वर्षांसाठी रद्द!

news

कायम शब्द वगळलेल्या पात्र शाळांना अनुदान मिळणार! दिपक केसरकर

news

Leave a Comment