क्राईम

बेपत्ता मुलीची तक्रार नोंदवायला गेलेल्या वडिलांकडे पोलिसांनी मागितली २५ सहस्र रुपयांची लाच!

Spread the love

बीड: – येथील नेकनूर पोलीस ठाण्यात बेपत्ता मुलीविषयी तक्रार नोंदवायला गेलेले दत्ता खराडे यांच्याकडे पोलिसांनी २५ सहस्र रुपयांची लाच मागितल्याचे वृत्त समोर आले आहे. खराडे यांनी पोलीस अधीक्षकांकडे याविषयी तक्रार केली आहे. मुलीला शोधण्यासाठी पोलिसांनी चारचाकी गाडीची मागणी केल्याचेही खराडे यांनी म्हटले आहे. ‘कुंपणच शेत खाणार असेल, तर नेमके जायचे कुणाकडे ?’, असा प्रश्न त्यांनी केला आहे.देशासह राज्यातील विविध ठिकाणी मुली आणि महिला यांचे बेपत्ता होण्याचे प्रमाण प्रचंड आहे. राज्यात गेल्या ३ मासांत ३ सहस्रांहून अधिक तरुणी बेपत्ता झाल्याची नोंद आहे. नोंद न झालेल्यांची संख्या मिळून ही संख्या वाढूही शकते.


Spread the love

Related posts

देशी गोवंशाची अवैध तस्करी करणारे पोलिसांच्या ताब्यात!

news

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापकावर लैंगिक छळाचा गुन्हा दाखल

news

दिव-दिमण येथून ३ ट्रेलर ट्रकमधून आणलेली उरण-जासई येथे ७६ लाखाची दारू पकडली.

news

Leave a Comment