क्राईम

बेपत्ता मुलीची तक्रार नोंदवायला गेलेल्या वडिलांकडे पोलिसांनी मागितली २५ सहस्र रुपयांची लाच!

Spread the love

बीड: – येथील नेकनूर पोलीस ठाण्यात बेपत्ता मुलीविषयी तक्रार नोंदवायला गेलेले दत्ता खराडे यांच्याकडे पोलिसांनी २५ सहस्र रुपयांची लाच मागितल्याचे वृत्त समोर आले आहे. खराडे यांनी पोलीस अधीक्षकांकडे याविषयी तक्रार केली आहे. मुलीला शोधण्यासाठी पोलिसांनी चारचाकी गाडीची मागणी केल्याचेही खराडे यांनी म्हटले आहे. ‘कुंपणच शेत खाणार असेल, तर नेमके जायचे कुणाकडे ?’, असा प्रश्न त्यांनी केला आहे.देशासह राज्यातील विविध ठिकाणी मुली आणि महिला यांचे बेपत्ता होण्याचे प्रमाण प्रचंड आहे. राज्यात गेल्या ३ मासांत ३ सहस्रांहून अधिक तरुणी बेपत्ता झाल्याची नोंद आहे. नोंद न झालेल्यांची संख्या मिळून ही संख्या वाढूही शकते.


Spread the love

Related posts

एकतर्फी प्रेमातून येरवडा (पुणे) कारागृहातील महिला शिपायाला पेटवून देण्‍याचा प्रयत्न !

news

मध्यप्रदेशच्या उज्जैनमध्ये १२ वर्षांच्या मुलगीवर बलात्कार! माणुसकीला काळीमा फासणारी घटना.

news

शेतीला प्रारंभ होण्‍यापूर्वीच राज्‍यात आढळले लाखो रुपयांचे बोगस खतांचे साठे!

news

Leave a Comment