राजकारण

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्ष सुनावणीवर आतापर्यत सर्वोच्च न्यायालयानं नोंदवले महत्वाचे मुद्दे.

Spread the love

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुरु असणाऱ्या सुनावणीवर आतापर्यत सर्वोच्च न्यायालयानं सात मुद्दे नोंदवले आहेत. हे महत्वाचे सात मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत.

१. नवाब रेबिया प्रकरण ७ सदस्यांच्या घटनापीठाकडं जण्याची गरज आहे.

२. अध्यक्षानी केवळ राजकीय पक्षाच्या व्हीपलाच मान्यता द्यायला हवी. त्यामुळं भरत गोगावले यांची नियुक्ती बेकायदा असल्याचं कोर्टानं म्हटलं.

३. पक्षांतर्गत वादाकडं राज्यापलांनी पाहण्याचा अधिकार नाही.

४. जे पत्र राज्यपालांना देण्यात आलं होतं. पण त्यांच्या अधिकार क्षेत्रात ते येत नाही. निवडणूक आयोगाला पक्षनाव आणि चिन्हाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार

५. राज्यपालांनी बहुमत चाचणीचा निर्णय देणं बेकायदेशीर होतं. पण उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री होता येणार नाही कारण त्यांनी स्वत:हून राजीनामा दिला आहे.

६. राज्यपालांची भूमिका चुकीची, त्यांना कोणतेही राजकीय निर्णय़ घेण्याचा अधिकार नाही. त्यांना बहुमत चाचणी बोलावण्याचा अधिकार नाही. त्यांचे निर्णय राजकीय हस्तक्षेप म्हणावा लागेल.

७. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यायला नको होता. त्यांच्या राजीनाम्याने अनेक प्रश्न निर्माण झाले.त्यावेळी त्यांनी काही गोष्टी निदर्शनास आणून दिले असते तर वेगळे चित्र दिसले असते.


Spread the love

Related posts

अमृता फडणवीस लाच प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया !

news

वर्ष २०२४ पर्यंत एकनाथ शिंदेच मुख्‍यमंत्री! चंद्रशेखर बावनकुळे

news

६ मे या दिवशी बारसू येथे प्रकल्‍पग्रस्‍तांची भेट घेणार! – उद्धव ठाकरे

news

Leave a Comment