राजकारण

सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यावर शिंदे गटातले १६ आमदार अपात्र होऊ शकतात! आमदार नितीन देशमुख

Spread the love

शिवसेनेच्या ठाकरे गटातील १२ ते १३ आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याची शक्यता उद्योग मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली आहे. यावर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख म्हणाले, त्यांच्या गटातले २४ आमदार काहीतरी गडबड करतील या भितीने ते लोक असला अपप्रचार करत आहेत. ठाकरे गटाचा एकही आमदार त्यांच्या संपर्कात नाही. सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यावर शिंदे गटातले १६ आमदार अपात्र होऊ शकतात. तसेच ते जर ६ वर्षांसाठी अपात्र झाले तर या लोकांना विधानसभेच्या दोन निवडणुका लढता येणार नाहीत. म्हणजेच ही मंडळी १० वर्ष घरी बसतील. कुठलीही निवडणूक लढू शकणार नाहीत. त्यावेळी उरलेल्या २४ आमदारांची मजा येईल. ठाकरे गटात जे आमदार आहेत त्यापैकी एकही आमदार त्यांच्या संपर्कात नाही. परंतु आपल्या २४ आमदारांनी काही गडबड केली नाही पाहिजे म्हणून हा अपप्रचार त्यांच्याकडून सुरू आहे.

दरम्यान, शिंदे गटातले आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आहेत का असा प्रश्न विचारल्यानंतर देशमुख म्हणाले की, ते संपर्कात आहेत की नाही, याबद्दल मला माहिती नाही. परंतु ते नाराज आहेत हे त्यांनी अनेकदा भेटींदरम्यान सांगितलं आहे. आमचं नुकसान झालं, पुढे आमचं भवितव्य काही नाही अशी चर्चा ते खासगीत करतात. यांच्यापैकी कुणी परत शिवसेनेत (ठाकरे गट) आलं तर त्यांना पक्षात स्थान दिल जाऊ नये. देशमुख एबीपी माझाशी बोलत होते.


Spread the love

Related posts

वर्ष २०२४ पर्यंत एकनाथ शिंदेच मुख्‍यमंत्री! चंद्रशेखर बावनकुळे

news

येणाऱ्या आठवड्यात महाराष्ट्राच्या राजकारणात हा भूकंप होणार! नितेश राणे

news

महाराष्ट्रातील १८ लाख सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे! सरकारच्या वतीने त्यांना जे चांगले देता येईल ते देण्याची आमची जबाबदारी आहे! देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

news

Leave a Comment