राजकारण

अजित पवारांना मुख्यमंत्री बनायचं असेल तर त्यांनी आमच्या सोबत आलं पाहिजे! रामदास आठवले

Spread the love

भाजप नेते, खासदार गिरीश बापट यांचं २९ मार्चला निधन झाले. त्यानंतर पुणे लोकसभेची पोटनिवडणूक होणार की नाही, कधी होणार, यावरून चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान, याच विषयावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रमुख रामदास आठवले यांनी महत्वाचे विधान केलं आहे. रामदास आठवले म्हणाले की, खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर त्यांच्या जागी होणाऱ्या निवडणुकीत आम्ही आमचा कोणताही उमेदवार देणार नाही, पण भाजप जो उमेदवार देईल त्याला आम्ही पाठिंबा देऊ, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली. पुण्यात माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे.

खासदार गिरीश बापट यांचं २९ मार्चला निधन झालं
विरोधी पक्ष नेते अजित पवार

अजित दादांनी मुख्यमंत्री बनण्याची इच्छा जरी व्यक्त केली, तरी त्यांना महाविकास आघाडी मध्ये मुख्यमंत्री होता येणार नाही. अजित पवारांना मुख्यमंत्री बनायचं असेल तर त्यांनी आमच्या सोबत आलं पाहिजे आणि आमच्या सोबत युती सोबत, NDA सोबत आले तर भविष्य काळात त्यांचा विचार होईल, असे देखील रामदास आठवले म्हणाले.


Spread the love

Related posts

मुंबईत संपन्न होणाऱ्या वज्रमुठ सभेच्या पूर्वतयारीसाठी कल्याण पूर्वेत महाविकास आघाडीच्या बैठकांचा सिलसिला जोरात

news

सत्ताधारी आणि विरीधकांच्या आरोप प्रत्यरोपामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनात गदारोळ

news

गृहमंत्रालय झेपत नसेल तर देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा! सुप्रिया सुळे

news

Leave a Comment