स्टोरी

देशद्रोहाचा कायदा रहित करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने घटनापिठाकडे पाठवली !

Spread the love

१३ सप्टेंबर वार्ता: सर्वोच्च न्यायालयाने १५२ वर्षे जुना देशद्रोहाचा कायदा रहित करण्याची मागणी करणारी एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया, तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा आदी ५ जणांची याचिका ५ न्यायमूर्तींच्या घटनापिठाकडे पाठवली.या वेळी झालेल्या सुनावणीच्या वेळी केंद्रशासनाने ही सुनावणी पुढे ढकलण्याची मागणी केली. केंद्रशासनाने सांगितले की, ११ ऑगस्ट २०२३ या दिवशी लोकसभेत या कायद्यात पालट करण्याचे विधेयक सादर करण्यात आले आहे; मात्र न्यायालयाने ही विनंती नाकारत याचिका घटनापिठाकडे पाठवली. न्यायालयाने म्हटले की, जरी या कायद्यात पालट करण्यात आला, तरी जुन्या प्रकरणांवर याचा परिणाम होणार नाही.


Spread the love

Related posts

आता अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याला फाशीची शिक्षा

news

समृद्धी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसला अपघात झाल्यानंतर मिळाली PUC!

news

कल्याण पूर्वेतील ‘संविधान गुण गौरव’ स्पर्धेला उत्फुर्त प्रतिसाद !

news

Leave a Comment