स्टोरी

हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केल्यामुळे एस.आर. दळवी फाउंडेशनने समुद्रकिनाऱ्यावर आयोजित केलेली स्वच्छता मोहीम स्थगित!

Spread the love

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्हयात हवामान खात्याने कमी दाबाच्या पट्टयामुळे ४८ तासात अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी केल्यामुळे एस. आर. दळवी फाउंडेशनने सोमवारी २ ऑक्टोंबर रोजी वेंगुर्ला तालुक्यातील वायंगणी समुद्रकिनाऱ्यावर आयोजित केलेली स्वच्छता मोहीम स्थगित केली आहे.

विलवडे गावचे सुपुत्र रामचंद्र दळवी आणि सिता दळवी या दांम्पत्याने स्थापन केलेल्या बहुउद्देशीय अशा राज्यस्तरीय एस.आर. दळवी फाउंडेशनने राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या ६७ व्या जयंतीचे औचित्य साधुन पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने प्रत्यक्ष कृतीसह जनजागृतीसाठी वायंगणी समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले होते.

 

       मात्र हवामान खात्याने जिल्हयात रेड अलर्ट इशारा दिल्यामुळे ही स्वच्छता मोहिम तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय फाऊंडेशनच्या सिंधुदुर्ग व मुंबई कोअर कमिटीने घेतला आहे. सदर मोहिमेची नवीन तारीख लवकरच कळविण्यात येईल. याची सर्वांनी नोंद घ्यावी असे आवाहन एस आर दळवी फाउंडेशनचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष सचिन कृष्णा मदने, उपाध्यक्ष चेतन बोडेकर, सरचिटणीस विजय गावडे यांनी केले आहे.


Spread the love

Related posts

जुनी पेन्शन योजना १०० टक्के देण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन…..

news

९५ टक्क्यांहून अधिक ग्रामस्थ आणि कोकणवासियांचा रिफायनरी प्रकल्पाला विरोधच !

news

उठ भगिनी जागी हो, चंडी दुर्गा गार्गी हो । भगीनींनो स्वतःमधील क्षात्रवृत्ती जागृत करून राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी सिद्ध व्हा !

news

Leave a Comment