स्टोरी

आजच्या दिवसाची सुरुवात एका चांगल्या विचाराने! जय जय रघुवीर समर्थ! श्लोक क्रमांक ३ आणि अर्थ!

Spread the love

प्रभाते मनी राम चिंतीत जावा,

पुढे वैखरी राम आधी वदावा,

सदाचार हा थोर सांडू नये तो,

जनीं तोची तो मानवी धन्य होतो ||३||

अर्थ: पहाट झाल्यावर श्रीरामाचे स्मरण करावे आणि नंतर श्रीरामाचे नाव उच्चारावे. सद्वर्तन थोर असते ते सोडू नये. कारण सदाचारी माणूसच सर्व जनांमध्ये धन्य होतो. सकाळी उठताक्षणी तू मनामध्ये श्रीरामाचे चिंतन कर आणि नंतर दिवसभरातही तुझ्या बोलण्यामध्ये सर्वप्रथम रामाचा उल्लेख असू दे. हा नित्याचा परिपाठ ठेव. सोडू नकोस. कारण असा परिपाठ ठेवणारा माणूस धन्य होतो, समाधानी होतो.

जय जय रघुवीर समर्थ!


Spread the love

Related posts

गोविंद चित्र मंदिर समोरील रस्त्यावर सुकलेल्या वृक्षाची मोठी फांदी पडली..! मोटर सायकल स्वार सुदैवाने वाचला

news

पुरातत्त्व खात्याच्या निरीक्षणानुसार श्री महालक्ष्मी देवीची मूर्ती सुस्थितीत असल्याने मूर्तीवरील स्नान-अभिषेक आदी नित्योपचार तात्काळ चालू करा ! – देवीभक्त सकल हिंदू समाजाची मागणी

news

एक दिव्यांग व्यक्ती धावला दिव्यांग भगिनींच्या मदतीला.

news

Leave a Comment